Wednesday, October 07, 2015

कामाठीपुरा - नामदेव ढसाळ


कामाठीपुरा 

कॅलेंडरला हेपलून
कित्येक शतकांचा उपदंश देहावर मढवून
निशाचर साळींदर पाहुद्लाय इथं
दिसतं कसं लोभस करड्या गुच्छासारख
स्वप्नातच अविरत दंग दंग

मनुष्य झालाय मुका
त्याचा परमेश्वर बुळगा
या पोकळीला कंठ फुटेल काय?

हवं  तर लोखंडी डोळा निगराणीवर ठेव
असेल, तर त्यातलाही अश्रू गोठवून ठेव
त्याचं  छकड रूप पाहून सुटतो ताळतंत्र संयमाचा
ते खडबडून होत जाग
बोचकारत काटेरी फण्यान जिव्हारी
ते जखमा करून सोडतं  आरपार
रात्र होते उपवर तशी जखमांना फुटतात फुले
फुलांचे पसरतात समुद्र नितांत
नितांताचे नाचत राहतात मैथूनमोर

हा नरक
हा गरगरणारा भोवरा
हे ठणकणारे कुरूप
हि घुंगणारी वेदना

ढाळ, ढाळ, अंगावरली कात एकदा मुळापासून!
 सोलून घे स्वतःला
हे विषाक्त सनातन गर्भाशय होऊन जाऊ दे निर्देहि ,
या ढिम्म मांसाच्या गोळ्याला
फुटायला  नकोत अवयवांचे धुमारे
हे पोटशियम सायनाईड
घे, घे चव याची !
क्षणाच्या कितीव्या तरी भागावर मरताना
लिहून ठेव अभिप्रेत होत जाणारा निम्न एस.

गोड किंवा खारट
विषाची चव घेण्यास जुंपल्यात इथं  रांगा.
शब्दासारखे इथे मरण देखील आले आहे भरून
बस्स , थोड्या वेळात इथे सरी कोसळू लागतील

कामाठीपुरा
सर्व मौसमांना बगलेत मारून
तू फतकलास चिखलात
या छिनाल सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन
मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची.
-चिखलातलं कमळ. 

 -नामदेव ढसाळ


 कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ ह्यांच्याविषयी :
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील
पूर (ता. खेड ) गावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचे बालपण गेले. त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती. दलित चळवळीकडे आकर्षित झाले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील गोलपीठा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली.
१९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला, व त्यानंतर आणखी कवितासंग्रह. 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' हा माओइस्ट विचारांवर आधारित, तर 'प्रियदर्शिनी' हा (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. तर 'खेळ' हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे.

Wednesday, June 17, 2015

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी - संत गोरा कुंभार

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी
तेणे केले देशोधोडी आपणियाशी !!१!!
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें
ऐकलें सांडिले निरंजनी, मायबापा !!२!!
एकत्व पाहतां अवघे लटिके
जें पाहें तितुके रूप तुझें मायबापा !!३!!
म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंग
तुम्हां आम्हां ठाव कैसे काय,  मायबाप !!४!!

संत गोरा कुंभार
 

Wednesday, October 15, 2014

कबीर दास के दोहे

 कबीर दास के दोहे 

बोली एक अनमोल है, जो कोई बोलै जानि। 
हिये तराजू तौलि के, तब मुख बाहर आनि।
(यदि कोई सही तरीके से बोलना जानता है तो उसे पता है कि वाणी एक अमूल्य रत्न है। इसलिए वह ह्रदय के तराजू में तोलकर ही उसे मुंह से बाहर आने देता है।)

कबीरा खड़ा बाज़ार में, मांगे सबकी खैर।
ना काहू से दोस्ती,न काहू से बैर।
(इस संसार में आकर कबीर अपने जीवन में बस यही चाहते हैं कि सबका भला हो और संसार में यदि किसी से दोस्ती नहीं तो दुश्मनी भी न हो।)

अति का भला न बोलना, अति की भली न चूप।
अति का भला न बरसना, अति की भली न धूप।
(न तो अधिक बोलना अच्छा है, न ही जरूरत से ज्यादा चुप रहना ही ठीक है जैसे बहुत अधिक वर्षा भी अच्छी नहीं और बहुत अधिक धूप भी अच्छी नहीं है।)

दोस पराए देखि करि, चला हसन्त हसन्त।
अपने याद न आवई, जिनका आदि न अंत।
(यह मनुष्य का स्वभाव है कि जब वह  दूसरों के दोष देख कर हंसता है। तब उसे अपने दोष याद नहीं आते जिनका न आदि है न अंत।)

जब गुण को गाहक मिले, तब गुण लाख बिकाई।                                               
जब गुण को गाहक नहीं, तब कौड़ी बदले जाई।
(कबीर कहते हैं कि जब गुण को परखने वाला गाहक मिल जाता है, तो गुण की कीमत होती है। पर जब ऐसा गाहक नहीं मिलता, तब गुण कौड़ी के भाव चला जाता है।)

Saturday, September 13, 2014

आई

सतत आपल्या मुलांसाठी झटणाऱ्या आईची महती तसे शब्दात सांगणे कठीणच.. 

आई

आई एक
नाव असतं
घरातल्या घरात
गजबजलेलं
गाव असतं !

सर्वात असते
तेव्हाजाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही,
नाही म्हणवत नाही.

जत्रा पांगते पालं उठतात,
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात,

आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
जिवाच जिवालाच कळाव असं जाते देऊन काही


आई असतो एक धागा ,
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा,

घर उजळते तेव्हा तीच नसत भान,
विझून गेली अंधारात कि,
सैरावैरा धावायला कमी पडत रान !

 पिकं येतात जातात
माती मात्र व्याकूळच
तिची कधीच भागत नाही तहान
दिसत काहीच नसल डोळ्यांना
तरी खोदत गेलो खोल खोल कि,
सापडतेच अंत:करणातील खाण

आई खरच काय असते
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते,
दुधावरची साय असते,  लेकराची माय असते,

आई असते जन्माची शिदोरी
सारतही नाही अन उरतही नाही.